आणि अखेर या विश्वातल्या सर्वात ताकदवान राष्ट्राने त्या लादेनला ठार करून अपमानाचा बदला घेतलाच ! पण त्यासाठी या सामर्थ्यशाली देशाला १० वर्षे वाट पहावी लागली ,करोडो रुपये खर्च करावे लागले .जोपर्यंत लादेन सापडत नव्हता तोपर्यंत थयठयात चालू होता.अक्षरशः लाजिरवाणी स्थिती होती.एव्हढे बलशाली राष्ट्र , त्याला कोण हा लादेन १० वर्षे गुंगारा देत होता.एक मात्र मान्य करावे लागेल कि लादेन ने त्यांची मग्रुरी चांगलीच ठेचून काढली.शेवटी फक्त आणि फक्त झुंड शाहीच्या जोरावर त्यांनी घरात घुसून लादेनला कंठस्नान घातले. आता अमेरिकेने सुटकेचा निश्वास टाकला असेल. परंतु आता त्यांच्या पुढचे आव्हान वाढले आहे.अल कायदा त्याच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.असो.
परंतु विषय हा आहे कि असा अमेरिकेला अधिकार कोणी दिला कि कुणाच्याही घरात घुसण्याचा?मी तर म्हणेन लादेन खरे तर चांगलाच! त्याने या सामर्थ्यवान राष्ट्राला आव्हान दिले होते.( म्हणजे त्याच्या निरपराध लोकांना लक्ष्य करणे हे कधीही वाईटच ) परंतु हि अमेरिका जेव्हा स्वतःच्या दादागीरीसाठी इराक,लिबिया यावर हल्ले करते तेव्हा हि निरपराध माणसे मरतातच ना? त्यावेळी या अमेरिकेला का कळवळा यात नाही?म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी दरवेळी भूमिका बदलवणारी हि पाखंडी अमेरिका सर्व वादाचे मूळ आहे.
या लादेन बद्दल मला काही आत्मीयता नाही परंतु जर स्वाभिमान ,प्रखर राष्ट्राभिमान आणि स्वतःच्या धर्माविषयी असणारी निष्ठा मागायची ठरली तर भगवंताकडे मी या गोष्टी लादेन सारख्याच मागेन !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा