मला हे पाश्चात्यांचं खूप आवडतं की कुणाबद्दलही कृतदनत्यां व्यक्त करायला ते उगीच कंजूष पणा करीत नाहीत....ज्याने त्याने आपल्यावर उपकार केले आहेत किंवा आपले जीवन ज्या मुळे सुकर झाले आहेत त्याबद्दल ते खुल्या मनाने अभिप्राय देतात. फादर्स डे त्यापैकीच एक.
म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत आपणही आभार किंवा कृतज्ञाता व्यक्त करतो पण ती अंग चोरून किंवा लपून छपून... पाश्चात्य संस्कृतीत असे नाही,जेही कराल ते दिल खोलके... हेच मला भावतं... नाहीतर तुमच्या मनात खूप आहे पण तुम्ही बोलत नाही मग ते काय उपयोगाचं?असो..
आपण आता आजच्या फादर्स डे बद्दल बोलू..बऱ्याच जणांना आपल्या वडिलांबद्दल आदर असतो पण ते शब्दात वगक्त करीत नाहीत...अहो आजचा जमाना सगळं संगण्याबद्दल आहे ,नाही की लपवण्याबद्दल...खरे तर जुना जमानाही असाच होता पण तो या आनंदाला वंचित राहिला.पण आज तसे नाही,बऱ्याच गोष्टी आहेत आजकाल..तुम्ही व्यक्त होऊ शकतात कुठेही अन कसेही...अन गरज आहे याची.
आजकाल जीवन बिनभरवश्याचे झालेले आहे कधीही काही होऊ शकते...त्यामुळे मनी आलेले विचार लगेच सांगितले पाहिजेत किंवा हे जे त्यासाठी दिन झालेले आहेत त्या दिवशी तरी किमान सांगितले पाहिजे नाहीतर नन्तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
मी तर म्हणेन ,जर तुम्हाला एखाद्याबद्दल कृतदनात्या व्यक्त करायची असेल तर तुम्ही उशीर करू नका...सांगा लगेच नाहीतर उशीर होईल.
असो...आजच्या फादर्स डे बद्दल..माझे खरे स्फूर्तिस्थान माझे वडीलच..त्यामुळेच मी घडलो... आज ते हयात नाहीत परंतु त्यांची कायम स्मृती स्मरणात राहील....