पृष्ठे

गुरुवार, १० मार्च, २०२२

माझी बहिण माझी दुसरी आई....

प्रिय दीदी,(जरी मी मोठा तुझ्यापेक्षा,तरी मला तू आदरस्थानी),
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा....
असं फॉर्मल होणं मला पटत नाही पण जे जिवापलीकडचे लोकं आहेत त्यांना कधी तरी कृतज्ञातेने साद घातलीच पाहिजे,भले त्यांना आवडो न आवडो....कारण आजकालच्या बेभरवश्याच्या युगात निदान आपल्या माणसांना तरी आपण थोडी त्यांच्या कार्याची पावती दिलीच पाहिजे किंबहुना ती गरज आहे काळाची...
अशी माझी बहिण,जशी दुसरी माझी आई..तिचा दरारा काय सांगावा, अजूनही मी तिला ,तिच्या विचारांना पहिले प्राधान्य देतो.कसे असते सांगू का?जर कोणीही तुम्हाला कोणताही स्वार्थ न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने,तुम्ही चुकीचे असला तरीही तुमच्या मागे खंबीर उभे ठाकतो ना,तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीस देवासमान लेखतात.... इथं एक गोष्ट सांगतो...जेव्हा तुम्ही चुकीचे असाल तेव्हा ही सगळ्यांसमोर साथ देईल पण एकांतात तुमची खरडपट्टी काढेल अन सांगेल तुम्ही कसे चुकलात...हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.त्यामुळे तर ती माझ्या आई समान आहे.अन विशेष म्हणजे या तिच्या समतल स्वभावाचा दरारा आहे,उगीच नाही माझी पोरं अजूनही तिला दबकतात त्यांच्या आई पेक्षाही...
मी सदोदित नोकरीमुळे बाहेर राहिलो,पण निर्धास्त होतो कारण ती आहे...तिने कधीही माझी उणीव भासू दिली नाही.इव्हन माझ्या बायकोची अत्यंत विश्वासू अन भरवश्याची मैत्रीण बनली ती,माझ्या मुलांचे लाड करावे तिनेच.तिचा आदरयुक्त दरारा आहे,अन माझ्या मुलांनाच नाही,किंवा पत्नीलाच नाही तर मलाही आहे... ती आहे तशीच...
स्वतःचे सगळे दुःख पचवून ती उभी आहे एखाद्या पहाडासारखी आमच्या मागे,ती आहे म्हणून मी निश्चित आहे.....
खरं तर मी खूप भाग्यवान अशी बहीण मला भेटली.....
माझ्या या बहिणीस ...नाही माझ्या दुसऱ्या माऊलीस वाढशिवसाक्सच्या खूप खूप शुभेच्छा......😊

रविवार, ६ मार्च, २०२२

स्वत्व....

काल कोणीतरी मला म्हटलं की काय राव एकटेच राहतात.कधीतरी कुणामध्ये मिसळा,सगळ्यांना समजावून घ्या.
मी मनातच हसलो...अरे मी अजून मलाच समजलो नाही अन बेट्या तू बाकीच्यांची बात करतो आहेस....त्याला दाखवले नाही पण एक फॉर्मलिटी म्हणून ok म्हटलो.
पण या विषयावर मी जेव्हा विचार करू लागलो तर उडालोच...
खरंच माणूस स्वतःला ओळखतो का आयुष्यभर? कारण तो नेहेमीच गुंतलेला सगळ्यांच्या विचारात अन स्वतःच्या विवंचनेत.त्याला नेहेमीच चिंता स्वतःची अन दुसऱ्याच्या प्रगतीची... हा हा हा विनोदाचा भाग सोडू पण खरं सांगा की माणूस कधी स्वतःला ओळखतो का? कधी स्वतःला प्रश्न करतो? कधी आत्मपरीक्षण करतो?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बहुतेक नाहीच येतील दुर्दैवाने...
मला खूप हसू येते... की यत्किंचिन्त जीवन,त्यात कधी काय होणार माहिती नाही अन तरीही मूढ मनुष्य आत्मप्रौढी करतो.
अन असेही नाही,अनेक उदाहरणे समोर. पण मला अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे की काय विचार असतील बरे याचे?
अन विशेष म्हणजे या विचारात मी गुरफटतो....अन अजून एकाकी होतो.
परवा मला एक जण विचारत होता की तुम्ही एवढे फिरता तर कुठले देश पाहिलेत?पुन्हा मी मनाशीच हसलो ,अरे बाबा अजून माझा देशच इतका विविधतेने नटलेला आहे की त्याला जर पहायचे ठरले तर एक नाही अनेक जन्म थिटे पडतील अन तू दुसरे देश घेऊन बसलायएस.... अरे बाबा मान्य की सगळे फिरले पाहिजे पण उगीच जायचे अन शिवून यायांचें हा आपला प्रांत नाही बाबा....मी कुठेही जातो पण ते ठिकाण सगळे माझ्यात सामावतो त्याशिवाय ती भेट मला परिपूर्ण वाटत नाही...
असो. .भरकटलो नेहेमीप्रमाणे.हे असेच मी संगतो काय अन कुठं भरकटतो असाच...नेहेमीचेच... अर्धवट मी ,कुठल्याही विषयावर असेच अर्धवट ठेऊन कुठेही जाणार....सॉर
पण तुम्ही ठाम रहा....
माझे काय,कुठलाही विषय परिपूर्ण नाही.
तर काय बोलत होतो? अरे हो...
सगळ्यांशी बोला,मिसळा वगैरे
पण मला एक सांगा जर आपण आपल्याशीच अनोळखी राहू तर दुसऱ्याशी कसे रुबरु होऊ शकतो यार...त्याचेही सर्कल असेल ना
सोडा यार...आपण पहिले आपले होऊ मगच दुसऱ्याचे होऊ...
पचणारे नाहीत माझे विचार,मान्य
पण असेच विचार असेच माझे,भंपक अन समजण्या बाहेर...
सोडा
तर आपण आपल्याला समजावून घेऊ आधी मग सगळ्यांना पाहू
कारण स्वतःचे ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून हे नको आहे मला
तर आत्मसमृद्ध होऊ पहिले अन बघू दुसर्याकडे असे माझे भंपक विचार....
पण करू अंमल त्यावर...