मी मनातच हसलो...अरे मी अजून मलाच समजलो नाही अन बेट्या तू बाकीच्यांची बात करतो आहेस....त्याला दाखवले नाही पण एक फॉर्मलिटी म्हणून ok म्हटलो.
पण या विषयावर मी जेव्हा विचार करू लागलो तर उडालोच...
खरंच माणूस स्वतःला ओळखतो का आयुष्यभर? कारण तो नेहेमीच गुंतलेला सगळ्यांच्या विचारात अन स्वतःच्या विवंचनेत.त्याला नेहेमीच चिंता स्वतःची अन दुसऱ्याच्या प्रगतीची... हा हा हा विनोदाचा भाग सोडू पण खरं सांगा की माणूस कधी स्वतःला ओळखतो का? कधी स्वतःला प्रश्न करतो? कधी आत्मपरीक्षण करतो?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बहुतेक नाहीच येतील दुर्दैवाने...
मला खूप हसू येते... की यत्किंचिन्त जीवन,त्यात कधी काय होणार माहिती नाही अन तरीही मूढ मनुष्य आत्मप्रौढी करतो.
अन असेही नाही,अनेक उदाहरणे समोर. पण मला अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे की काय विचार असतील बरे याचे?
अन विशेष म्हणजे या विचारात मी गुरफटतो....अन अजून एकाकी होतो.
परवा मला एक जण विचारत होता की तुम्ही एवढे फिरता तर कुठले देश पाहिलेत?पुन्हा मी मनाशीच हसलो ,अरे बाबा अजून माझा देशच इतका विविधतेने नटलेला आहे की त्याला जर पहायचे ठरले तर एक नाही अनेक जन्म थिटे पडतील अन तू दुसरे देश घेऊन बसलायएस.... अरे बाबा मान्य की सगळे फिरले पाहिजे पण उगीच जायचे अन शिवून यायांचें हा आपला प्रांत नाही बाबा....मी कुठेही जातो पण ते ठिकाण सगळे माझ्यात सामावतो त्याशिवाय ती भेट मला परिपूर्ण वाटत नाही...
असो. .भरकटलो नेहेमीप्रमाणे.हे असेच मी संगतो काय अन कुठं भरकटतो असाच...नेहेमीचेच... अर्धवट मी ,कुठल्याही विषयावर असेच अर्धवट ठेऊन कुठेही जाणार....सॉर
पण तुम्ही ठाम रहा....
माझे काय,कुठलाही विषय परिपूर्ण नाही.
तर काय बोलत होतो? अरे हो...
सगळ्यांशी बोला,मिसळा वगैरे
पण मला एक सांगा जर आपण आपल्याशीच अनोळखी राहू तर दुसऱ्याशी कसे रुबरु होऊ शकतो यार...त्याचेही सर्कल असेल ना
सोडा यार...आपण पहिले आपले होऊ मगच दुसऱ्याचे होऊ...
पचणारे नाहीत माझे विचार,मान्य
पण असेच विचार असेच माझे,भंपक अन समजण्या बाहेर...
सोडा
तर आपण आपल्याला समजावून घेऊ आधी मग सगळ्यांना पाहू
कारण स्वतःचे ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून हे नको आहे मला
तर आत्मसमृद्ध होऊ पहिले अन बघू दुसर्याकडे असे माझे भंपक विचार....
पण करू अंमल त्यावर...
100% correct
उत्तर द्याहटवा