मान्य आहे रे की सगळेच एकदम जन्मतः कार्यक्षम नसतात,किंवा थोडी फार कमी असते रे सर्वांमध्ये...पण याचा अर्थ असा नाही की मनाला लावून अशी exit घ्यावी. असतात रे मर्यादा एखाद्याला,कमी जास्त प्रमाणात असतात गुण अवगुण...पण असे निघून जाणे...अरे यार..!
परवाच थोडी गरमागर्मी झाली,पण काल बोललो ना रे आपण हितगुज..... केली आपण चौकशी आपल्या कुटुंबाची....किती भर भरून सांगत होतास तू तुझ्याबद्दल,तुझ्या पोरांबद्दल....मग असा निष्ठुर का झालास? पोरांना पोरकं करून गेलास,ज्यांच्याबद्दल बोलतांना तुला किती अभिमान ,किती भरून आलेलं....
वाईट वाटत रे आम्ही तुझ्याबद्दल मजाक केले,हसलो पण त्याची इतकी भयंकर सजा देशील हे स्वप्नातही वाटलं नाही...
आज सकाळी ही आपण बोललो,बापरे...कल्पना ही अस्वस्थ करते की आपण आज बरोबर होतो अन हे भयंकर आक्रीत घडले....
सोपं आहे रे ,न सांगता गुपचूप निघून जाणं, पण यातना होतात रे अश्या गोष्टीने...
जग रहाटी आहे,जग चालूच राहील पण तुझ्यासारखा मृदू अन सहनशील सहकारी कायम स्मरणात राहील.....
परमेश्वर तुझ्या आत्म्यास सदगती देवो....😢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा